
मुंबईतील कल्याणमध्ये कोळसेवाडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. पार्टीला बसले असतानाच दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला पण, हा वाद एकाचा जीवावर बेतला आहे.कल्याण : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच झोपेत असलेल्या मित्राची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची घटना कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरामध्ये उघडकीस आली. अनिल यादव असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी हिरालाल निषाद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कल्याण कोळशेवाडी खडेगोलवली परिसरात (Kolsewadi Police Station) अनिलकुमार यादव व हिरालाल निशाद हे दोघे मित्र भाड्याच्या रूममध्ये राहत असून एका चपलीच्या कारखान्यात काम करत होते. हे दोघे मित्र एका ठिकाणी पार्टी करण्यास बसले व या दरम्यान दोघांमध्ये किरकोळ वाद झाला यावेळी हिरालालने ‘तुझे रात में बताता हूं’ अशी धमकी दिली. यानंतर हिरालाल अनिलकुमारच्या झोपण्याची वाट पाहत होता. तो झोपल्यानंतर हिरालालने त्याची गळा आवळून हत्या केली. पहाटे जेव्हा अनिल कुमारचे इतर मित्र त्याला उठवत होते तेव्हा तो जागेवरून उठला नाही हे पाहताच त्याच्या मित्रांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. कोळसेवाडी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता अनिल कुमार याची गळा आवळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.
रात्रीच्या सुमारास अनिल गोडाऊन मध्ये झोपलेला असताना हिरालाल याने मोबाईल चार्जरच्या वायरने अनिलचा गळा आवळून त्याची हत्या केली. सकाळी कामगारांनी अनिलचा मृतदेह पाहून याबाबत पोलिसांना कळवले. कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. या हत्येप्रकरणी हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
